Raigad Guardian Minister : आता थांबलं पाहिजे… रायगड पालकमंत्रिपद वादात दादांची मध्यस्थी, केलं मोठं विधान तर गोगावले म्हणताय, आम्हाला हौस नाही….

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील नेत्यांमध्ये तीव्र मतभेद दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आता तुटेपर्यंत ताणलं गेलंय, थांबलं पाहिजे असे म्हणत हा वाद संपुष्टात आणण्याची गरज व्यक्त केली. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगवले यांनी प्रतिक्रिया देत, अजितदादा एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही दोन पावलं पुढे टाकू असे नमूद केले.