हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका करत मुंबई लुटल्याचा आरोप केला, तर फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नसल्याचे स्पष्ट केले. या भाषणांमुळे आगामी मुंबई मनपा निवडणूक केंद्रस्थानी आली आहे.