ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. निविदेतील अटीनुसार 134 रुपये किलोचे हिरवे वाटाणे देण्याऐवजी 30 रुपये किलोचे पांढरे वाटाणे पुरवले जात असल्याचा दावा पाटील यांनी केला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.