केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला उद्धव ठाकरेंची चूक म्हटले. यामुळे मुंबईत महायुतीला नॉन-मराठी मते मोठ्या प्रमाणात मिळतील, असे आठवले म्हणाले. दरम्यान, पुणे महापालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.