नाशिकच्या तपोवनात कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. सरकारने डॅमेज कंट्रोल म्हणून हजारो झाडे लावण्याची घोषणा केली असली, तरी पर्यावरणप्रेमी यास विरोध करत आहेत. या वादामुळे नाशिक शहराच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्का लागत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.