Sanjay Raut : "प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे यावेळी ही लढाई प्रत्येकाची असायला हवी. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी माणूस, महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे जागरुकता, उत्साह आणि आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झालाय. आम्ही मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहोत. भले तुम्ही पैशांचा खेळ खेळा, पण आम्ही आमची लढाई लढणार. इतिहासात नोंद राहिली पाहिजे" असं संजय राऊत म्हणाले.