महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींनी वेग घेतला आहे. महेंद्र दळवी यांनी लवकरच चौथा बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा केली असून, यामुळे काही राजकीय व्यक्ती रोहा सोडून विदेशात पळतील असा दावा त्यांनी केला आहे. दळवी यांनी कॅश बॉम्ब आणि सुपारी देऊन लोकांना उभे करणे यावर नाव न घेता सुनील तटकरेंवर टीका केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पालकमंत्र्यांवरील विधानाचाही उल्लेख केला.