संजय राऊत यांनी मिंध्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या कृतींना डुप्लिकेट संबोधले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा महाराष्ट्राची गरज असल्याचे ते म्हणाले. पक्षफुटी कायद्याची अंमलबजावणी न झाल्याबद्दल निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. तसेच, १९ डिसेंबरला महत्त्वाचे राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.