धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावरील अटकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कोकाटेंचे मंत्रिपद गेल्यास मुंडे यांना पुन्हा संधी मिळणार का, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.