दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि ड्रग्ज रॅकेटच्या विळख्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण दिल्याचा आरोप करत, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाभोवतीच्या वादांवरून फडणवीस सरकारला लक्ष्य केले. ड्रग्ज कारखान्यांची वाढ आणि मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले रॅकेट यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.