पाथरडीतील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शहरी विकासाच्या योजनांवर भर दिला. पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान आणि भुयारी गटार योजनांसह अनेक प्रकल्पांचा उल्लेख केला. जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही देत, महिलांना लखपती दीदी बनवण्याचे आवाहनही त्यांनी केले.