दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा चौथा टी20 सामना रद्द झाल्यावर बीसीसीआयला समजली चूक, आता असा बदल करणार!

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील चौथा टी20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला. पहिल्यांदाच अशा पद्धतीने सामना रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे बीसीसीआयची जगभरात नाचक्की झाली आहे. आता बीसीसीआय ही चूक दुरूस्त करण्यासाठी पावलं उचलणार आहे. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.