२४ वर्षांपूर्वी, २००१ मध्ये १३ डिसेंबरला, पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करून धाडस दाखवले होते. मात्र सुरक्षा दलांनी अतुलनीय शौर्य दाखवत हल्ला उधळून लावला आणि सर्व पाच दहशतवाद्यांना ठार मारले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी घटनेनंतर हा दिवस भारतीय इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला. हा हल्ला चर्चेत असणाऱ्या धुरंधर सिनेमात दाखवण्यात आला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...