Uddhav Thackeray : कोकाटे यांच्यानंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, ‘मातोश्री’वरून ठाकरे यांचा दावा, रोख कुणावर?

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर दुसराही मंत्री लवकरच पायउतार होईल, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात अंधाधुंद कारभार सुरू असून, अंमली पदार्थांच्या कारखान्याशी संबंधित मंत्र्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. त्यांनी जनतेला आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या प्रकरणांचा विचार करण्याचे आवाहन केले.