पोलिसांचा सौम्य लाठीमार… ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड, धक्कादायक प्रकाराने अंबरनाथमध्ये खळबळ

अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. सकाळी 200 हून अधिक बोगस मतदार पकडल्यानंतर, EVM मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस ओळखपत्रे आढळली. विविध मतदान केंद्रांवर गैरव्यवहार आणि भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमधील वादामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. या धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.