अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. सकाळी 200 हून अधिक बोगस मतदार पकडल्यानंतर, EVM मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस ओळखपत्रे आढळली. विविध मतदान केंद्रांवर गैरव्यवहार आणि भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमधील वादामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. या धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.