काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाला झोपलेला आणि नालायक संबोधत त्यांनी आरोप केला की, ५००० रुपयांचे पाकीट मतदारांना प्रलोभन म्हणून वाटले जात आहे. अशा स्थितीत पुढील निवडणुका निष्पक्ष कशा होतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.