मुंबईसह आठ महानगरपालिकांमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदा ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन शिवसेना गट एकमेकांविरोधात लढत आहेत. या निवडणुकीत शिंदे गट, भाजप, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटही महत्त्वाचे आव्हान निर्माण करत असल्याने निकालाबाबत उत्सुकता आहे.