महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीने २०० चा आकडा पार करत विजयाची नोंद केली आहे. भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आणत आपली ताकद दाखवली, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांकडे आता लक्ष लागले आहे.