स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीच्या विजयावर सामनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जनतेला भाजपच्या कारभाराला कंटाळा आला असताना, हे कसे जिंकले, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. ही निवडणूक पैसा आणि सत्तेच्या जोरजबरदस्तीने जिंकल्याचा आरोपही सामनाने केला आहे.