पुण्यातील महायुती जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने ३५ जागांची मागणी केली असून, भाजपने मूळ शिवसेनेच्या चिन्हावर किती पदाधिकारी निवडून आले असा सवाल केला आहे. वरिष्ठांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने उदय सामंत पुण्यात आले आहेत.