Nitesh Rane : पण आता ती वेळ आलीये, काही गोष्टी बोलल्या नाही तर…, पराभवानंतर नितेश राणे थेट चव्हाण यांच्या भेटीला

मंत्री नितेश राणे यांनी ट्वीट करत "पक्ष आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी आतापर्यंत गप्प होतो, पण आता वेळ आली आहे" असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सिंधुदुर्गमधील नगरपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का बसल्यानंतर आणि शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळाल्यानंतर राणेंचे वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे.