आजपासून महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात, कोण कोण अर्ज भरणार? तुमच्या प्रभागातील स्थिती काय ?
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्यास आज सुरूवात होत असून अंतिम मुदत 30 डिसेंबर आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती-जागावाटपावर खलबतं सुरू आहेत.