कोकणातील नगरपरिषद निवडणुकीनंतर राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष वाढला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत, 16 जानेवारीनंतर (महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर) कोकणात मोठा राजकीय स्फोट होईल, असे संकेत दिले आहेत. निलेश राणेंवर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप करत, बोलवता धनी कोण, हे उघड करण्याचे आश्वासन दिले आहे.