मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात पाच तास चर्चा होऊन २०० जागांवर सहमती झाली. उर्वरित २७ जागांवर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. महायुती १५० हून अधिक जागा जिंकून आपला महापौर निवडून आणण्याचा संकल्प करत आहे.