नाशिकमध्ये भाजपामधील पक्षप्रवेशावरून देवयानी फरांदे भावूक झाल्या. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, ही त्यांची भूमिका आहे. काही दलालांनी स्वार्थापोटी राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. चाळीस वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या फरांदे यांनी, पक्ष मोठा होत असताना जुन्या कार्यकर्त्यांचा बळी दिला जाऊ नये अशी मागणी केली आहे.