विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज खेळत आहेत. मात्र त्यांचा खेळ पाहण्याची संधी हुकल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोघांनी शतक ठोकलं पण त्यांचा खेळ काही पाहता आला नाही. पण हे सामने लाईव्ह का दाखवले नाही? याचं कारण आर अश्विनने सांगितलं.