महाड निवडणुकीतील राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तरी त्याला अद्याप अटक नाही. यावरून संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मंत्र्यांच्या मुलांवर कारवाई का नाही, त्यांना अभय दिले का, यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत राऊतांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.