Mahayuti Conflict: नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली, रंगली शाब्दिक चकमक

सातारा येथे महायुतीचे मंत्री जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात नाद व दहशत या शब्दांवरून शाब्दिक वाद उफाळला आहे. गोरे यांनी नादाला लागल्यास सोडणार नाही असे म्हटले, तर देसाईंनी दमदाटीच्या भाषेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.