आमदार संतोष बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही दिली. हिंगोली आणि कळमनुरी नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवत शिंदे साहेबांचा बालेकिल्ला सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करत असल्याचेही बांगर यांनी स्पष्ट केले.