सांगोल्यातील सभेत शहाजीबापू पाटील यांनी एक अजब वक्तव्य केले. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला मतदान करणार्यांना स्वर्गात स्थान मिळेल आणि देव त्यांना नरकात घेणार नाही, असे त्यांनी म्हटले. राज्याच्या राजकारणात हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले असून, राजकीय वर्तुळातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.