महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी तीव्र झाली आहे. वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी मिळत असल्याने मुंबईत मातोश्रीबाहेर, तर नागपुरात गडकरींच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी निदर्शने करत अश्रू ढाळले. यामुळे अनेक ठिकाणी राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे.