शरद पवार गटातून नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची मालिका सुरु आहे. मुंबईच्या राखी जाधव यांनी भाजपत, तर पुण्याचे प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेले. महाविकास आघाडीतील जागावाटप आणि अजित पवारांशी युतीमुळे शरद पवार गट अडचणीत सापडला असून, निष्ठावंत कार्यकर्ते संभ्रमात आहेत. हे पक्षासाठी मोठे आव्हान ठरत आहे.