राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये उमेदवारांची धावपळ सुरू असून, एबी फॉर्मसाठी लॉबिंग केली जात आहे. युती-आघाडीच्या निर्णयामुळे काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी उमेदवारांना मोठा ताण आहे. आज सायंकाळपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.