उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उरले फक्त काही तास, उमेदवारीसाठी वेटिंगवाले टेन्शनमध्ये… काय काय घडतंय?

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये उमेदवारांची धावपळ सुरू असून, एबी फॉर्मसाठी लॉबिंग केली जात आहे. युती-आघाडीच्या निर्णयामुळे काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी उमेदवारांना मोठा ताण आहे. आज सायंकाळपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.