भांडूप पश्चिमेला काल रात्री झालेल्या भीषण बस अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले. रिव्हर्स घेताना इलेक्ट्रिक बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि अनेक निष्पाप नागरिक चिरडले गेले. मृतांची नावे समोर आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले. या घटनेने मुंबई हादरली आहे.