छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट नाकारल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करत पदाधिकारी आक्रमक झाले आहेत, काहींनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला. मुंबईत राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे गट-भाजप जागावाटपाचे सूत्र ठरले असून, राज ठाकरेंनी मुंबई वाचवण्याचे आवाहन केले आहे.