महाराष्ट्र गृह विभागाने नवीन वर्ष 2026 च्या सेलिब्रेशनसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबरला राज्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी कठोर अटी लागू केल्या आहेत, ज्यात खाजगी सुरक्षा रक्षक आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मुंबईत 17 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असतील.