महाराष्ट्रभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कार्यालयात राडा केला, तर नाशिकमध्ये तिकीट वाटपातील गैरव्यवहाराचे आरोप करत कार्यकर्त्यांनी एबी फॉर्मच्या वाटपाला विरोध केला. अनेक शहरांमध्ये तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.