नितेश राणेंनी ठाकरे गटावर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, असेही ते म्हणाले. त्यांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, रवींद्र चव्हाण वसई-विरार मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, जिथे ते भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.