मुंबई महापौर पदासाठी निवडणुकीच्या प्रचाराआधीच राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. कृपाशंकर सिंग यांच्या उत्तर भारतीय महापौर विधानानंतर वारिस पठाण यांनी बुरखेवाली महापौर होईल, असे म्हटले. यावरून ठाकरे गट, मनसे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर संजय निरुपम यांनीही उत्तर भारतीयांच्या बाजूने उडी घेतली आहे.