ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. वांद्रे प्रभागातील ११ पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. मनासारखी उमेदवारी न मिळाल्याने किंवा जागा वाटपावरून झालेल्या नाराजीमुळे हे राजीनामे देण्यात आले आहेत, ज्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.