उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. नागपुरात कार्यकर्त्यांनी बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांना घरात कोंडून ठेवले. नाशिकमध्ये मुकेश शहाणे बंडखोरीवर ठाम राहिले, तर मुंबईतही शिंदे सेना आणि भाजपमध्ये वाद उफाळला. या बंडखोरीला शमवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करावे लागले.