मनसेच्या एकत्र मेळाव्यात अमित ठाकरे यांनी तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयावरून एका मंत्र्यावर तीव्र शब्दांत टीका केली. १५०० झाडे तोडण्याच्या सरकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकांचा विरोध असतानाही हा निर्णय घेणे म्हणजे मंत्र्यांचा माज असून, तो काढायचा आहे, असे ते म्हणाले.