BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत, बंडखोरही गेम बिघडवणार? राजकीय पक्षांचे टेन्शन

मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षांनी बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, भाजप आणि ठाकरे गटासमोर अनेक ठिकाणी बंडखोर कायम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही बंडखोरांची मनधरणी केली, तर ठाकरे गटाला वरळी आणि मातोश्री परिसरातही आव्हान आहे. चौरंगी लढतीत बंडखोर प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.