Maharashtra Civic Polls: राज्यातील 29 पालिकेत 66 नगरसेवक बिनविरोध, सर्वाधिक कोणाचे? निवडणूक आयोग सखोल चौकशी करणार

महाराष्ट्रातील 29 पालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, ज्यात भाजपचे सर्वाधिक 43 उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडणुकांवर सविस्तर अहवाल मागवला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये भाजपच्या अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांमध्ये तीव्र वाद झाला, अर्ज माघारी घेण्याच्या वेळी झालेल्या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.