सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त छगन भुजबळ यांनी नायगाव येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. २५ वर्षांपूर्वी २-३० लाखांसाठी अडचणी असताना आता १५० कोटींचे भूमिपूजन झाल्याचे त्यांनी नमूद केले. देवा देता है तो छप्पर फाड के देता है असे म्हणत त्यांनी फडणवीसांचे आभार मानले. नायगावचे क्रांतीज्योती सावित्रीनगर असे नामकरण करण्याची मागणीही त्यांनी केली.