महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ६६ बिनविरोध नगरसेवकांच्या निवडींना न्यायालयात आव्हान देणार आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात सोमवारी न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. त्यापूर्वी, निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ६४ ठिकाणच्या घटनांबाबत पत्रव्यवहार केला जाईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले.