उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील सभेतील डोम कावळे संबोधनावरून विरोधकांवर निशाणा साधला. मुंबईचा महापौर मराठी व हिंदूच होणार असल्याचे ते म्हणाले, तसेच महायुतीने केलेल्या विकास प्रकल्पांच्या श्रेयवादावरून सरकारवर टीका केली. कोस्टल रोड, वैतरणा धरण यांसारख्या कामांचे श्रेय चोरले जात असल्याचा आरोप करत, त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.