Saamana : सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद… बिनविरोध फार्स मग निवडणुका का? ‘सामना’तून टीकास्त्र

सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंत्रणांचा उन्माद टोकाला पोहोचल्याचे यात म्हटले आहे. निवडणूक लढण्यापूर्वीच विजय विकत घेण्याचा प्रकार सुरू असून, ७० जागांवर बिनविरोध विजय मिळवल्याचा दावा केला आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी लोकशाहीचे माफियाकरण केल्याचा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे.