'धुरंधर' या चित्रपटातील रेहमान डकैतच्या भूमिकेमुळे अभिनेता अक्षय खन्ना सध्या यशाच्या शिखरावर आहे. थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. परंतु यामुळे रणवीर सिंहसोबत अन्याय झाल्याची भावना धुरंधरमधल्याच एका अभिनेत्याने व्यक्त केली आहे.