मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकोट आणि अंबरनाथमधील काँग्रेस-एमआयएमसोबतच्या स्थानिक आघाड्यांवर संताप व्यक्त केला आहे. अशा आघाड्या भाजपसोबत चालणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले, तसेच कारवाईचे संकेत दिले. काँग्रेसला नेहमीच तीव्र विरोध राहिल्याचे सांगत शिंदे साहेबांचा उठाव याच वृत्तींविरोधात होता असेही त्यांनी नमूद केले.